जयकुमार गोरे | राष्ट्रवादी विरोधी (शरदचंद्र पवार पक्ष) चे उमेदवार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड पासवर्डमधील घुमट (ता. कर्जत) ग्रामपंचायतीवर भाजपने उमेदवारी केली आहे. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा वापर करून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (जयकुमार गोरे) यांनी घुमारी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा आदेश काढला आहे. या उमेदवार मूळ रोहित पवारांच्या विजयात भाजपला एक विजय उत्साही जात आहे.
काय आहे प्रकरण?
घुमरी येथील ॲड. शिवाजीराव अनभुले आणि ग्रामस्थांनी २७ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामपंचायतीविरुद्ध तक्रार केली होती. ग्रामपंचायतीने त्यांच्या उत्पन्नातील १५ टक्के निधी मागासवर्गीय समाज घटकांच्या विकासासाठी खर्च केला नाही, असे या तक्रारीत म्हटले होते. २०२१-२२ या आर्थिक वर्षात २२ हजार ६१९ रुपये आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३३ हजार ६७ रुपये, असे एकूण ५५ हजार ६८६ रुपये ग्रामपंचायतीने मागासवर्गीयांसाठी खर्च केले नाहीत, अशी त्यांची तक्रार होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून ग्रामपंचायतीने मागासवर्गीयांसाठीचा निधी खर्च केला नसल्याचा अहवाल सादर केला. या अहवालानंतर ॲड. अनभुले यांनी ग्रामपंचायत बरखास्तीसाठी थेट भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे अपील दाखल केले. त्यांच्या वतीने ॲड. एल. के. गोरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
ग्रामविकास मंत्र्यांचा आदेश
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५४ च्या तरतुदीनुसार, ग्रामपंचायतीने मागासवर्गीय समाज घटकांसाठी निधी खर्च करणे बंधनकारक आहे. सरपंच आणि सदस्यांनी हे कर्तव्य पार पाडण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आल्याने ग्रामपंचायत बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आली.
यावर सरपंच संगिता अनभुले आणि इतर सदस्यांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चौकशीसाठी ग्रामपंचायतीत आले नाहीत, तसेच निधी खर्च करण्यासाठी कोणतेही मार्गदर्शन केले नाही. शिवाय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत बरखास्तीचा प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यांनी असाही युक्तिवाद केला की, त्यांना आपले म्हणणे सादर करण्याची कोणतीही संधी दिली गेली नाही, ज्यामुळे नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन झाले नाही. तसेच, विरोधकांचा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे राजकीय हेतूने खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मात्र, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सरपंच आणि सदस्यांचा हा बचाव फेटाळून लावला. त्यांनी घुमरी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा आदेश दिला. या कारवाईमुळे रोहित पवारांच्या मतदारसंघात भाजपच्या मंत्र्याने थेट पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा:
• “मी रडणारा नाही, लढणारा कार्यकर्ता”; नवी जबाबदारी समर्थकांच्या बळावर पार पाडणार, आमदार रोहित पवार
• जामखेडमध्ये विखे पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव शिबिर संपन्न